राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सोमवार दिनांक २०/०६/२०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकेतर महामंडळ पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या सभेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत राज्यामध्ये एकसारखेपणा असावा व ज्या जिल्ह्यामध्ये पदोन्नती दिली जात नाही त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर १०,२०,३० वर्षाच्या सेवेनंतर देण्यात येणाऱ्या वरच्या श्रेणी बाबत या विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. व याबाबत सभागृहांमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण करीन असे बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले.याचबरोबर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा बाबतचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. समीर सावंत सर यांना सूचना देण्यात आल्या. या सभेसाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचे ओ. एस. डी. विजय बोरसे यांचे अतिशय मोलाचे योगदान लाभले अशी माहिती शिक्षकेतर महामंडळाची राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच तोडगा काढू….. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
June 20, 20220
Related Articles
August 12, 20200
फोटोंबरोबर छेडछाड करत ४२ वर्षीय फॅशन डिझायनरचे शोषण
चित्रपटांमध्ये काम देतो असं सांगून ४२ वर्षीय महिलेचे शोषण करणाऱ्या एका व्य
Read More
April 3, 20192
मातोश्री विरोध भोवला; शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या चा पत्ता कट ; ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक
मुंबई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून
Read More
July 13, 20201
Coronavirus : देशाभरात ‘कोरोना’ संक्रमितांची संख्या 8 लाख 79 हजारपेक्षा जास्त, आतापर्यंत 23 हजारपेक्षा जास्त लोकांनी गमावला जीव
मुंबई : - चीनच्या वुहानमधून सुरू झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग देशभरात दि
Read More